नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर मागच्या दीड महिन्यांपासून कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली आहे. तर दुसरीकडे नेहमीच आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आता शेतकरी आंदोलन विरोधात वादग्रस्त विधान केले आहे.
साक्षी महाराज म्हणाले, ” शेतकरी आंदोलनात भरकटलेले शेतकरी आहे. या आंदोलनातून कृषी कायद्याचे विरोध होत नसून सीएए, एनआरसी, कलम 370 चं दु:ख व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, साक्षी महाराजांनी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.