भुवनेश्वर : देशांत सर्वत्र लॉकडाऊन असला तरी ओडीशातील एक खासदार भुवनेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात एक ट्रक घेऊन फिरत आहे. त्यांच्या या कृत्याचं सर्वंच कौतूक करत आहेत. कौतुक करताहेत ते ज्या कारणासाठी फिरत आहेत त्यासाठी… ते रस्त्यावर भटक्या मुक्या जनावरांच्या तोंडात दोन घास पडावेत म्हणून झटत आहेत… या अवलीया खासदाराचे नाव आहे, अच्यत सामंता.
भुवनेश्वर, खंडागिरी धौलीगिरी, शिखरचंडी पर्वतावर फिरणाऱ्या भटक्या माकडांसाठी हिरव्या भाज्या आणि अन्न पदार्थ देण्याचे सामंता यांनी ठरवले. कोरोना विषाणूंच्या साथीमुळे पर्यटक कमी झाल्यामुळे या माकडांची उपासमार होत होती. त्या पार्श्वभूमीवर सामंता यांनी हा निर्णय घेतला.
सामंता हे किस फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. या संस्थेच्या वतीने 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण, जेवण आणि वास्तव्याची सोय करण्यात येत आहे. तांदूळ, साखर आणि कोरड्या अन्न धान्याची पाकिटे 40 हजार गरीब कुटुंबाना वाटण्यात आली. लॉकडाऊन केल्यापासून 20 दिवास हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.