मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात एक कार्यक्रम पार पडला होता यात मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमानंतर भाजपच्या महिला पदाधिकारीने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातवरण चांगलाच पेटलं होत. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि आव्हाड एका व्यासपीठावर दिसणार होते परंतु आव्हाड यांनी खोचक ट्विट करत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, “आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील …” असा टोला आव्हाड यांनी ट्विटच्या ,माध्यमातून लगावला आहे.
तसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात,” त्यापेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बर, परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही … खरच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जयेगा …… u too brutas”
त्या पेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बर परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही …
खरच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जयेगा …… u too brutas— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 3, 2022
ठाण्यात ‘हर हर महादेव’ या चित्रपटादरम्यान झालेल्या राड्यानंतर एका कार्यक्रमात आव्हाड यांच्यावर विनय भंगाचा आरोप झाल्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आता आव्हाड यांनी सावत्र पवित्रा घेत सोशल मीडियाद्वारे टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळते.