नवी दिल्ली :(वंदना बर्वें) सकाळपासूनच दिल्लीकरांच्या काळजाचा ठोका चुकला होता.प्रत्येकजण अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रार्थंना करीत होते. आणि शेवटी दोनच्या सुमारास चित्र स्पष्ट झालं नि मुख्यमंत्री पदाची माळ तिसऱ्यांदा केजरीवालांच्या गळयात पडली आणि दिल्लीकरांनी सुटकेचा श्वास घेतला.
यातच केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवस असल्याने “लेडी लक’ची विशेष चर्चा दिल्लीत रंगली होती. तर सीपीतील नवसाला पावणाऱ्या बजरंगबलीचा आशीर्वादही केजरीवाल यांना लाभला असल्याने बुंदीच्या लाडवांचा प्रसाद हनुमंताला अर्पंण करुन दिल्लीकरांचे विशेष आभार मानले.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला वाढदिवसानिमित्त अविस्मरणीय भेट दिली असल्याचे सांगताना सुनीताताईंचा चेहरा आनंदाने चमकत होता. प्रथमच दिल्लीकरांनी विकासकामांना मत दिले असल्याचा विशेष आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. गेल्या काही महिन्यापासून दिल्लीकरांना विजेचे बील भरावे लागले नाही. तसेच सबंध दिल्लीत गुलाबी तिकीटामुळे निःशुल्क प्रवास महिलांना करायला मिळत होता.
यामुळे केजरीवालांना दिल्लीकरांच्या ह्रदयात घर केले आहे. या छोटया बाबी असल्या तरी याचा प्रभाव बचत स्वरूपात हातात उरत असल्यामुळे खरंच दिल्लीकर केजरीवाल यांच्यावर मनापासून खुश आहेत.
त्यांना शाहीनबाग आणि हिंदुामुस्लीम यापेक्षाही या बाबी महत्वाच्या वाटतात , हे आजच्या ऐतिहासिक विजयाने स्पष्ट झाले. याशिवाय केजरीवालांचे साधे राहणीमान, त्यांचे सामान्य कुटुंब जिव्हाळयाचा विषय आहेच. एकुणच काय तर समाजमन बदलायला सुरूवात झाली आहे.
रोजच्या जीवनातील समस्या सोडविणारा नेताच जनतेला आपला वाटत असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्व झाले. तर मुलगी हर्षिंता आयटीमध्ये कार्यंरत असून वडीलांच्या विजयाचा पुर्णं विश्वास असल्याचे तिने सांगितले.
मुलगा पुलकीत आयटीचा विद्यार्थीं असून तरूणांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्यावर भर द्यायला बाबांना सांगणार असल्याचे सांगताना, त्याच्या चेहऱ्यावर वडीलांच्या विजयाचा आनंद दिसत होता.