दोस्ताना 2 या आगामी चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यन याला काढून टाकले आहे. यामागे दिग्दर्शक करण जोहरसोबत झालेला वाद हे कारण सांगण्यात येत आहे. यापुढेही धर्मा प्रॉडक्शनमध्ये कार्तिकला न घेण्याचेही करणने ठरवले आहे.
कार्तिक आर्यनच्या बेजबाबदार वर्तवणुकीमुळे करणला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला आहे. दोस्ताना 2 या चित्रपटासाठी कार्तिक पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. त्यामुळे निर्माते हैराण होते.
याशिवाय सिनेमाच्या उत्तरार्धाबद्दल कार्तिक आणि निर्मात्यांमध्ये काही मतभेद होते. यामागे जान्हवी कपूर आणि कार्तिकमध्ये काहीतरी बिनसले आहे हेही कारण पुढे येत आहे. कार्तिक हा यंग ऍक्टर असून तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे.
मात्र, थेट दिग्दर्शकाच्या डोळ्यात भरेल असे काहीतरी कार्तिककडून घडल्यास त्याच्या करिअरवर याचा प्रभाव पडू शकतो.