अक्षय कुमारचा सुपरहिट सिनेमा “भुलभुलैय्या’ चा सिक्वेल येतो आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये असणार आहे. या सिक्वेलच्या प्रॉडक्शनची तयारी पूर्ण झाली होती. मात्र आता काही अपरिहार्य कारणामुळे या सिनेमाचे शूटिंग बेमुदत थांबवावे लागले आहे. “भुलभुलैय्या 2’मध्ये कार्तिक आर्यनबरोबर तब्बू देखील लीड रोलमध्ये असणार हे निश्चित झाले होते. मात्र करोनाच्या लॉकडाऊननंतर सिनेमाचे शूटिंग गेल्या वर्षी थांबवावे लागले होते.
वर्षाच्या अखेरीस “अनलॉक’ला सुरुवात झाली आणि सिनेमांचे शूटिंग सुरू झाले, तेंव्हा तब्बूने या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे या सिनेमाचे शूटिंग बेमुदत थांबवावे लागले आहे. तब्बूने करोनाचे संकट पूर्णपणे समाप्त होईपर्यंत सिनेमाच्या शूटिंगसाठी कोणत्याही सेटवर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत या सिनेमाचे काहीही शूटिंग करणे अशक्य असल्याचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांना लक्षात आले.
तब्बूचा रोल या सिनेमात सर्वात महत्वाचा असल्यामुळे तिच्यासाठी सर्व शुटिंग थांबवणेच आवश्यक असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शूटिंग थांबवले. तब्बूने आपला निर्णय गेल्याच महिन्यात कळवला होता. त्यानंतरच “भुलभुलैय्या 2′ चे शूटिंग अडचणीत येणार हे स्पष्ट झाले होते. “भुलभुलैय्या 2’शी संबंधितांनी तब्बू ऐवजी अन्य हिरोईनची निवड करण्याचा पर्यायही सुचवला होता. मात्र अनीस बज्मीने तब्बूशिवाय कोणालाच घ्यायचे नाही, असे ठरवल्याने शूटिंग थांबवले गेले.