ठाणे – राज्यातील महाआघाडीच्या सरकार मध्ये घराण्याचा राजकीय वारसा नसलेल्या अनेकांना त्यांच्या व्यक्तीगत कर्ततुत्वाच्या आधारे मंत्रिपदाची संधी देण्यात आली असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे.
शनिवारी रात्री कळवा येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांनाही घराण्याचा राजकीय वारसा नाही. ते स्वकतृत्वावरच मोठे झालेले नेते आहेत असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की आव्हाड यांनी कळवा आणि मुंब्रा परिसरात चांगले विकास कार्य केले आहे.
राज्यात जे एकूण 43 मंत्री आहेत त्यातील 19 मंत्री हे राजकीय घराण्यांशी संबंधीत असल्याने या सरकारवर टीका झाली होती ती टीका खोडून काढण्यासाठी पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य अनेकांना कोणताहीं घराण्याचा वारसा नसताना संधी दिली गेली असल्याचे आवर्जून यावेळी नमूद केले.