विधीज्ञ मंचचा उपक्रम
पुणे – करोनामुळे चार महिन्याहून अधिक काळापासून न्यायालय बंद आहे. जामीन, रिमांड आणि गुन्ह्यातून वगळणे, अशा केवळ महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होत आहे. वकिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालये पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करावी, या मागणीसाठी वकिलांनी ऑनलाइन चळवळ सुरु केली आहे. न्यायालये कामकाज सुरू करावी की नाही? यासाठी विधिज्ञ मंचातर्फे वकिलांचा ऑनलाइन सर्व्हे घेण्यात येत आहे.
करोनाचे संकट एवढ्यात जाईल असे वाटत नाही. त्यामुळे कामकाज बंद ठेवणे हा त्याच्यावर उपाय नाही. सुनावणी होत नसल्याने वकिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही वकिलांनी आत्महत्या केल्या आहेत. पण, दुर्दैवाने ही बाब फारशी गंभीरपणे घेतली जात नाहीये. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तरी न्यायालये खबरदारीच्या उपाययोजनासहीत नियमितपणे पुर्णवेळ सुरू व्हावीत, अशी बहुतांश वकिलांची भावना आहे. त्यासाठी हा सर्वे घेण्यात येत आहे.
सर्वेचे निष्कर्ष उच्च न्यायालय, विधी व न्यायमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे अॅड. अतुल पाटील यांनी दिली. सर्व्हेत मत नोंदवण्यासाठी https://forms.gle/ubUcxMoHUihmgCyd6 लिंकवर क्लिक करा.