नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. करोनाची दुसऱ्या लाटेत उशिरा उपाययोजना केल्याने देशाला त्याची किंमत मोजावी लागली असा निशाणा ते वारंवार साधत आहेत. आजही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
एक तो महामारी,
उस पर प्रधान अहंकारी! pic.twitter.com/fO0GzXBpvL— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 23, 2021
“एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी” असे ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांनी ट्विट केलेल्या मजकुरात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांची माहिती देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइननुसार देशात कोरोना लसींची साठा उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारनं लसीकरणाची घोषणा केली, असा आरोप सीरमच्या सुरेश जाधव यांनी केल्याची बातमीच राहुल गांधींनी ट्विट केलीय.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ४० हजार ८४२ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५५ हजार १०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.