मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी यावेळी ठाकरे सरकारचा पेंग्विन महासरकार व्हायरस असा उल्लेख केला आहे.
अमृता फडणवीस यांना ट्विट करत म्हटले आहे की, कोरोना व्हायरस आणि पेंग्विन महासरकार व्हायरस हे दोघेही केंव्हा, कसे, कुठे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेतील हे सांगता येत नाही. क्वारंटाईनपासून वाचण्यासाठी यांच्यापासून दूर राहा, वेळोवेळी तोंडावर पट्टी लावा, सुरक्षित राहा, गप्प राहा, असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर जहरी टीका केली आहे.
कोरोना वायरस और 🐧 महा सरकार वायरस दोनो ही कब, कैसे, कहाँ मासूमों पर हावी हो जाए कह नहीं सकते !
क्वारंटाइन से बचने के लिए दूरी बनाए रखे और लगातार मुँह पर पट्टी लगाए रखे !
सुरक्षित रहे ! चुप रहे ! 🤭🤫😷#Dussehra #rawan #ReleaseSammetThakkar https://t.co/z2vs9QcFKX— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 25, 2020
समित ठक्कर या तरूणाला शनिवारी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अटकेनंतर आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत ठाकरे सरकारबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘पावरलेस’ मुख्यमंत्री असे ट्विट समित ठक्कर यांनी केले होते. यामुळे समितला अटक करण्यात आली आहे का? असा प्रश्न रंगनाथन यांनी ट्विट करत विचारला होती.
आनंद रंगनाथन यांनी केलेल्या या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला पेंग्विन महाव्हायरस सरकर अशी उपमा दिली आहे.