नवी दिल्ली – ‘वारीस पंजाब दे’चे प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांनी पोलिसांपासून फरार असतानाचा स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे. त्याने व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी पंजाब सरकार आणि पोलिसांवर टीका केली आहे, तसेच श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदारांना आवाहन केले आहे.
व्हिडिओमध्ये अमृतपालने श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदारांना बैसाखीच्या दिवशी सरबत खालसा बोलावण्याचे आवाहन केले आहे. जातीय प्रश्न सोडवण्यासाठी सरबत खालसा बोलवावा, असे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर जारी झालेल्या व्हिडिओमध्ये अमृतपाल सिंग काळी पगडी आणि शाल परिधान केलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये अमृतपालने म्हटले आहे की, “जर पंजाब सरकारचा मला अटक करायचे होता तर पोलिस माझ्या घरी आले असते आणि मी ते मान्य केले असते.” असं म्हणत अमृतपालने पंजाब पोलिसांवरही टीका केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगने जारी केलेला व्हिडिओ दोन ते तीन दिवस जुना असू शकतो. अमृतपालचा हा व्हिडिओ पहिल्यांदा यूकेमधील पंजाबी यूट्यूब चॅनलवर आला होता. या YouTube चॅनेलवर भारतात बंदी आहे. विशेष म्हणजे 18 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या संघटनेच्या ‘वारीस पंजाब दे’ विरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर अमृतपालबद्दल अनेक अपडेट्स आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेजही जारी केले, ज्यामध्ये अमृतपाल वेगवेगळ्या वेषात दिसत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपालने पोलिसांसमोर तीन अटीही ठेवल्या आहेत. त्याच्या अटींमध्ये पोलिसांनी अटक केलेल्याला शरण जावे, त्याला पंजाबच्या तुरुंगात ठेवावे आणि तुरुंगात मारहाण करू नये, असे त्याने म्हटले आहे.