मुंबई – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंद पुकारला. यावरून विरोधकांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील मैदानात उतरल्या. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमृता फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं होत की, आज वसुली सुरू आहे की ? कोणी मला सांगेल का #MaharashtraBandhNahiHai. अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो??
संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी. https://t.co/SdHZLYxPmp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 11, 2021
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटल की, वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी.