मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्या नुकतेच शाब्दिक युद्ध झाले. सोशल मिडीयावर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात उमटले. अमृता फडणवीस यांनी अतिशय कणखर शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. शिवसेनेनं सुद्धा या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले. मात्र आता याचा परिमाण अमृता फडणवीस यांना भोगावा लागणार आहे. राज्य सरकारने अक्ससीस बँकेतील २ लाख पोलिसांची वेतन खाती एसबीआय’मध्ये वळविण्याचा निर्णय घेतला होता.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर ठाणे महापालिकेनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता मुंबई महापालिकाही असाच निर्णय घेण्याच्या तयारीत असून अक्ससीस बँकेला मोठा झटका बसणार आहे. अमृता फडणवीस यांच्यावरील टीकेची शिवसेनेने गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ठाणे महापालिकेने निर्णय घेतल्याचं मी वाचलंय. काही बँका बुडाल्यानंतर लोकांना आपल्या पैशाबद्दल चिंता वाटतेय. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अकाउंट्स एनबीआय मध्ये वळविण्याचा आम्ही विचार करतोय.