मुंबई – महानगरपालिका निवडणुकांत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांची कामगिरी कशी राहते यावर केवळ त्या त्या पक्षांचे सामर्थ्य वधारते का घटते, एवढेच अवलंबून नाही. महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याशीदेखील हे निकाल जोडले गेलेले आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आरसा म्हणूनही महापालिका निवडणुकांकडे पाहिले जात आहे. कारण महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे प्रतिबिंब स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळेच या महापालिकांचे निकाल राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकतात.
यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशांमुळे यंदाही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याचे दिसून येते आहे. यावरून भाजप विरुद्ध सत्ताधारी पक्षात शाब्दिक युद्ध होतांना दिसून येत आहे. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे की,’भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणामागची कपटनीती समजून घ्या. फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी SEBC आरक्षणाचा कायदा मंजूर करून घेतला. आरक्षण हा केंद्र सरकारचा विषय असल्याने या प्रक्रियेत फडणवीस सरकारने मोदी सरकारला सामील करून घेणे आवश्यक होते तसे झाले नाही. SEBC ला (मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्ते च्या माध्यमातुन) फडणविसांनी योजनेने उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आणले. तिथे SEBC आरक्षण वैध ठरले. खरं तर केंद्र सरकारने EWC चा पर्याय निर्माण केला असताना SEBC चा आग्रह कशासाठी ? तो उघडा का पाडल्या गेला नाही? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी यांचे ट्विट
भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणामागची कपटनीती समजून घ्या. फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी SEBC आरक्षणाचा कायदा मंजूर करून घेतला. आरक्षण हा केंद्र सरकारचा विषय असल्याने या प्रक्रियेत फडणवीस सरकारने मोदी सरकारला सामील करून घेणे आवश्यक होते तसे झाले नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 25, 2022