मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला होता. मात्र हा आनंद व्यक्त करत असताना तिने भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून देशभर एकच गोंधळ निर्माण झाला आहे.
कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभारदेखील मानले. मात्र, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
कंगना रानौत च्या म्हण्यानुसार देशाला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असुन या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.@CMOMaharashtra@Dwalsepatil
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 11, 2021
कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे तिचाय्वर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. यातच आता कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तर, कंगनावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे.
कंगना राणावतच्या म्हण्यानुसार, देशाला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले. ‘ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे’, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेन्शन केलं आहे.