मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या ट्विटमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा अर्थसंकल्प मांडला. यात त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या तर काही खिशाला कात्री बसणाऱ्या योजना जाहीर केल्या.त्यावर सर्वपक्षिय नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. यावर अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले. पण यावेळी युजर्सनी त्यांच्या ट्विटमधील एक गोष्ट पकडून त्यांना वेगळाच सल्ला दिला आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बजेट चार ओळीत सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिले, “बजेट चार ओळीत, ज्या वस्तू घेतल्या आहेत…, त्या स्वस्त होणार. ज्या घ्यायचं ठरवलं आहे त्या महाग होणार” मात्र त्यांच्या ट्विटवर काही जणांनी वेगळाच आक्षेप घेतला आहे.
बजेट चार ओळीत
ज्या वस्तू घेतल्या आहेत …
त्या स्वस्त होणार.
ज्या घ्यायचं ठरवलं आहे त्या महाग होणार— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 1, 2023
बिईंग वन या फेक अकाऊंटने लिहिले की, व्हॉट्सअपवरुन कॉपी पेस्ट करुन आता बजेट समजवणार का? तर शंतनू नावाच्या युजरने, “दुसऱ्यांची कॉपी करून पोस्ट टाकता. स्वतःचे काही विचार आहे की नाही तुमचे” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
WhatsApp वरच Copy Paste करून, हा बजेट समजवणार…
— Being one ! (@uselessonefello) February 1, 2023
दुसऱ्यांची कॉपी करून पोस्ट टाकता. स्वतःचे काही विचार आहे की नाही तुमचे
— shantanu_m (@shantanu__muley) February 1, 2023
तर इतर युजरनी पातळी सोडून अमोल मिटकरी यांना ट्रोल केले आहे. आपल्या ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या मिटकरींना ट्रोलर्स नेहमीच ट्रोल करत असतात.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारा ठरला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतमालाला दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. या अर्थसंकल्पात मोदीजींनी नेहमीप्रमाणे मौन पाडून शेतकऱ्यांच्या जखमावर मिठ चोळले आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 1, 2023
मात्र हे गमतीशीर ट्विट टाकण्याआधी मिटकरी यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करणारे गंभीर ट्विट देखील केले होते. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांनी लिहिले, “केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारा ठरला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतमालाला दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. या अर्थसंकल्पात मोदीजींनी नेहमीप्रमाणे मौन पाडून शेतकऱ्यांच्या जखमावर मिठ चोळले आहे.”