जुन्नर – आठ महिन्यानंतर राज्यातील मंदिरे उघडण्यात आले आहेत. मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे.
मात्र ‘श्रद्धेच्या बाबतीत राजकारण होतं तेव्हा ते नक्कीच दुर्दैवी आहे. श्रेय घ्यायला पुढे येणाऱ्यांवरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी’ असा टोला राष्ट्रवादीचे नेते खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी लगावला. ते नारायण गाव येथे एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अमोल कोल्हे म्हणाले, आनंद साजरा करताना सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे ही त्रिसुत्री कायम आचरणात आणायला हवी, तेव्हाच करोनाचे संकट संपेल. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत, असे अमोल कोल्हे म्हणाले.
‘मंदिरे उघडली गेली आहेत, त्यानंतर जी काही त्रिसुत्री आहे तिचा अवलंब केला पाहिजे अन्यथा आज जे मंदिर उघडण्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत त्यांच्यावरच कापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी,’ असे म्हणत कोल्हे यांनी भाजपला टोला लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी नेते आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. ‘धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजप पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा हा विजय आहे भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये,’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय BJPपेढे वाटून
घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं.पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी,भाविक व जनतेचा हा विजय आहेBJPने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये.— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 16, 2020