खासदार डॉ. कोल्हे : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची घेतली भेट
रांजणगाव/ शिक्रापूर – पंचनामे करताना कुचराई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर लवकर कडक कारवाई केली जाईल. पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचे तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडणार आहे, अशी ग्वाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
वाघाळे (ता. शिरुर) येथील शेतकरी भिवाजी बबन शेळके यांनी बॅंकेचे शेतीवरील कर्ज आणि जास्त पावसाने झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे व विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सध्या पंचनामा करणारे अधिकारी व्यवस्थित पंचनामे करीत नसल्याचा पाढा वाचला. शेतकरी शेळके यांनी शेतावरील कर्जाचा डोंगर व व्यवस्थित होत नसलेले पंचनामे याला कंटाळून विद्युत रोहित्राला कवटाळून आत्महत्या केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आमदार वळसे पाटील यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या परिवाराला योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहे. राज्य सरकारच्या चाललेल्या चुकीच्या धोरणावर त्यांनी खोचक टीका केली. माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर म्हणाले की, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर आत्म्हत्येची वेळ आलेली आहे. या प्रकाराला शासकीय अधिकारी जबाबदार आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, सरपंच अमोल धरणे, राजेंद्र भोसले, दिलीप थोरात, राजेंद्र धायबर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुहास काटे, उद्योजक विजय थोरात, शामराव शेळके, अजिंक्य थोरात, गणेश पवार, भाऊसाहेब पवार, अनिल थोरात, गिताराम भोसले, हनुमंत कारकुड, दत्तात्रय टेमगिरे, प्रवीण थोरात, ग्रामस्थ उपस्थित होते.