मुंबई – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात काल चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच काल याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. त्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती आहे. त्यांच्या या वीरमरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
T 3565 – …. ज़रा आँख में भर लो पानी ; जो शहीद हुए हैं उनकी , ज़रा याद करो क़ुर्बानी .. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳they sacrificed their lives to protect our country , to keep us safe and secure. SALUTE Indian Army Officers and Jawans ! JAI HIND
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 16, 2020
“‘ज़रा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी.’ या जवानांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिलं. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझा सॅल्यूट, जय हिंद,” असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं. त्यांनी आपल्या ट्विटमधून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.