रांची: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंडच्या विकासावर चर्चेचे आव्हान दिले. रघुबर दास यांच्या कारकिर्दीत गेल्या पाच वर्षांत कोणताही घोटाळा झाला नाही आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप लावण्यात आले नाहीत, असा दावा झारखंडच्या चक्रधरपूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना शहा यांनी केला.
सोमवारी झारखंडच्या सिमडेगा येथे राहुल गांधींच्या निवडणूक सभेचा संदर्भ देताना शाह म्हणाले की, आज राहुल बाबा देखील झारखंडमध्ये आहेत आणि मी त्यांना आव्हान देतो की ते त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या 55 वर्षांच्या राजवटीची आणि गेल्या पाच वर्षांच्या भाजपच्या कारभारावर चर्चा करावी.
झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि झारखंड पूर्वचे बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी लावलेल्या आरोपांवर शहा बोलले नाहीत. मात्र गेल्या 5 वर्षात राज्यात भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोणताही मोठा घोटाळा झाला नसल्याचे सांगितले. बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी रघुवर दास यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते आणि ते म्हणाले की ते रघुवर दास नाहीत तर रघुवर हा ‘डाग’ आहे जो ‘अमित शहा यांच्या डिटर्जंट’ आणि नरेंद्र मोदींच्या वॉशिंग मशीनमध्येही साफ होऊ शकत नाही.
अमित शहा यांनी बैठकीत राम मंदिराच्या मुद्याबद्दल सांगितले की लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाईल. त्याचबरोबर, 2024 च्या लोकसभेच्या आधी संपूर्ण देशात एनआरसी लागू करून घुसखोरांची ओळख पटविली जाईल. मागासवर्गीय जातींच्या आरक्षणासंदर्भात, बॅकफूटवर असलेले झारखंड सरकार म्हणाले की, नवीन सरकार स्थापन झाल्यास लोकसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक कमिशन तयार करण्यात येईल.
राज्यात ओबीसी आरक्षण वाढवू
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की झारखंडमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होताच आदिवासी आणि दलितांचे आरक्षण कमी न करता ओबीसी समाजाचे आरक्षण वाढविण्यासाठी आम्ही एक समिती तयार करू. आम्ही तशी तयारी केली आहे.