पश्चिम बंगाल : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे वादात अडकण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगाल येथील एक प्रचार सभेत बोलताना अमित शहांनी ‘भारतीय वायुसेना’ म्हणण्याऐवजी ‘मोदी वायू सेना’ म्हटले आहे. कृष्णानगर येथील प्रचारसभेत आतंकवाद्यांच्या मुद्दा उपस्थित करत त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तनावर केलेल्या कारवाईचा उल्लेख केला.
शाह म्हणाले, पुलवामा आतंकवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शाहिद झाले. अशा हल्ल्यानंतर आधीचे सरकार शांत बसत होते. मात्र नरेंद्र मोदींनी आपल्या वायुसेनेला आदेश दिला आणि आपल्या वायुसेनेचे जवान बालाकोट मध्ये घुसून आतंकवाद्यांचे ठिकाण उद्वस्त करून परत आले.
यापूर्वी देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेला मोदींची सेना म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने नोटीस जारी करत त्यांना भविष्यात असे वक्तव्य न करण्याचे सांगितले.