नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या दोन दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे एनडीच्या गटात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (मंगळवारी) दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच, अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांसाठी संध्याकाळी 7:30च्या सुमारास दिल्लीत भोजनाचा बेत ठेवण्यात आला आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुखमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीआणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार तसेच, एनडीएचे आणखी दिग्ज नेतेमंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत एनडीएच्या प्रकत्येक नेत्याच्या आवडी-निवडीची काळजी विशेष घेण्यात येणार आहे. जेवणासाठी 35 वेग-वेगळे पदार्थ ठेवण्यात आले असून, उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास पुरण-पोळी ठेण्यात आली आहे. तसेच, पंतप्रधान मोदींसाठी विशेष गुजराती पद्धतीचे जेवण ठेवण्यात आले आहे. एनडीएच्या वेगवेळ्या राज्यातील नेत्यांसाठी वेगवेगळे पदार्थ ठेवण्यात आले आहे.
भाजपकडून आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, विरोधकांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून सर्वजण २३ मेरोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे डोळे लावून बसले आहेत.
Delhi: Shiv Sena Chief Uddhav Thackeray to attend dinner hosted by Amit Shah for NDA leaders today (file pics) pic.twitter.com/Kj3zzrbPJp
— ANI (@ANI) May 21, 2019