भुवनेश्वर : सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे मुस्लीम त्यांचे नागरिकत्व गमावतील, अशी चुकीची माहिती विरोधी पक्षांनी पसरवल्यानेच जातीय दंगली भडकल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
रामजन्मभूमी, सीएए आणि कलम 370 रद्द करण्यासारखे निर्णय घेतल्याबद्दल शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले मी यापुर्वीही सांगितले आहे आणि आता पुन्हा सांगतो, सीएएमुळे कोणत्याही मुसलीम व्यक्तीचे नागरिकत्व रद्द होणार नाही. हा कायदा पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी बनवला आहे. कोणाचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही. मात्र कॉंग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि ममतादिदी याबाबत असत्य पसरवत आहेत, असे ते म्हणाले.