दिल्ली – महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या सत्याग्रहामुळे ब्रिटिशांना त्यांचे गुडघे टेकावे लागले. त्यांनी जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला, असे प्रतिपादन गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी दिल्लीत केले आहे.
BJP President Amit Shah during ‘Gandhi Sankalp Yatra’ in Delhi: Gandhi ji’s satyagraha movement brought the British to their knees. He showed the path of truth and non violence to the world. #GandhiJayanti pic.twitter.com/fX63hEvNIy
— ANI (@ANI) October 2, 2019
आज देशात राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची 150 जयंती साजरी करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये भाजपने गांधी संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच भाजपचे अनेक नेते सहभागी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, दिल्लीतील राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींना अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली. यासोबतच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी राजघाटावर गांधीजींना अभिवादन केले.