नवी दिल्ली – गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक संस्था उघडून, अनुदानित घरे उपलब्ध करून आणि लाखो नोकऱ्या निर्माण करून मध्यमवर्गाची स्वप्ने पूर्ण केली असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
मोदी सरकारच्या नऊ वर्षांत मध्यमवर्गाची आर्थिक स्थिती झपाट्याने उंचावली आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे. ट्विटरवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना मोदींनी पुर्ण रूप दिले आहे आणि त्यातून त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी नव्या युगाची सुरूवात केली आहे.
गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की 7 लाख रुपयांपर्यंतच्या करसवलतीपासून ते जनऔषधीच्या माध्यमातून परवडणारी औषधे देण्यापर्यंत आणि विम्यापासून ते उडान अंतर्गत स्वस्त प्रवासापर्यंत, पंतप्रधान मोदींनी मध्यमवर्गीयांना आर्थिक मदत केली आहे.