पुणे – आंबेगाव बुद्रुक परिसरातील वेणुताई चव्हाण तंत्रनिकेतनची सीमाभिंत कोसळून 6 कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणात अटक केलेल्या दोघांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सत्यमेव रामराज चौहान (वय 47) आणि त्याचा मुलगा दिवाकर (वय 24, बालाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून आले आहे. बांधकामासाठी झालेले करारनामे जप्त करण्यासाठी आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. याचा तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केले. यास बचाव पक्षातर्फे ऍड. विवेक भरगुडे, ऍड. कुमार पायगुडे आणि राकेश ओझा यांनी विरोध केला.