Ambedkar Jayanti 2022 : भारताचे संविधान इतर देशांपेक्षा वेगळे आहे. हे संविधान प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करते आणि त्याच वेळी एक नागरिक म्हणून त्यांची कर्तव्ये देखील सुनिश्चित करते. या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ.भीमराव आंबेडकर प्रसिद्ध आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची संविधान निर्मितीतील भूमिका अतुलनीय आहे. याबाबत अनेकांनी अनेक युक्तिवाद केले पण डॉ. आंबेडकरांचे भारतीय राज्यघटनेतील योगदान आणि भूमिका नाकारता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. भीमराव आंबेडकरांना लहानपणापासूनच जातीआधारित भेदभावाला सामोरे जावे लागले. त्यांनी अनेक अडचणींसमोर हार मानली नाही आणि 32 पदव्या मिळवल्या. प्रगल्भ अर्थतज्ञ डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या, संविधान निर्मितीत बाबासाहेबांची भूमिका काय आहे.
भारताचे संविधान –
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची संविधान सभा स्थापन झाली. संविधान सभेचे एकूण 379 सदस्य होते, त्यापैकी 15 महिला होत्या. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ज्या काळात अस्पृश्यता आणि जाती-पातीचा विचार केला जात असे, तेव्हा अस्पृश्य व्यक्तीला प्रभावशाली स्थान मिळाले, ही मोठी गोष्ट होती. अनेक तज्ञांच्या मते बाबासाहेबांची प्रशासकीय कार्यक्षमता आणि राजकीय प्रभावामुळे संविधान सभेत त्यांची निवड झाली.
संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून आंबेडकर यांची निवड करण्यात आली. खरे तर, नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांची रूपरेषा मांडली होती, तेव्हा समितीतल सदस्य जयकर यांनी मुस्लिम लीगच्या प्रतिनिधीशिवाय कोणत्याही प्रस्तावावर मतदान करता येणार नाही, असे मत मांडले. त्यावर आंबेडकरांनीही प्रथमच हस्तक्षेप करून आपले मत मांडले. त्यांचा सल्ला ऐकून अनेक काँग्रेस नेते प्रभावित झाले.
आंबेडकरांचे संविधान निर्मितीत मोलाचे योगदान –
येथून संविधान सभेच्या मसुद्यात त्यांची भूमिका अधिक भक्कम झाली. त्यांनी संविधान सभेच्या चर्चेचे संचालन व नेतृत्व केले. आंबेडकरांनी अल्पसंख्याकांच्या हक्कांसंदर्भातील संबंधित कलमांवरील चर्चेदरम्यान सर्वांसमोर आपले मत मांडले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी अनेक समित्यांचे सर्व प्रस्ताव लेखात तयार केले. संविधानाची संपादकीय जबाबदारीही प्रामुख्याने आंबेडकरांनीच उचलली होती. ज्याला नंतर मसुदा समितीचे सदस्य असलेले टी. टी. कृष्णमाचारी यांनी संविधान सभेसमोर मांडले.