मुंबई – भारतीय क्रिकेट संघात जेव्हा संधी मिळाली तेव्हा सरस कामगिरी केल्यानंतरही बीसीसीआयमधील अंतर्गत राजकारणामुळे दोन खेळाडूंची कारकीर्द फारशी वाढली नाही व ते याच कोटा पद्धतीच्या तसेच राजकारणाचे बळी ठरले.
अंबाती रायडू व करुण नायर हेच हे दोन खेळाडू आहेत. रायडूने 2019 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी दावेदार होता. मात्र, आयत्यावेळी त्याला डावलून विजय शंकरला संधी मिळाली.
रायडूने त्यावेळी तडकाफडकी निवृत्तीही जाहीर केली होती. मात्र, नंतर त्याने हा निर्णय बदलला; परंतु अद्याप त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आलेले नाही.
तसेच आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत नायरने तिसऱ्याच सामन्यात त्रिशतकी खेळी केली होती, मात्र, तरीही त्याचा नंतर संघ निवडीदरम्यान विचार झाला नाही. या दोघांवर तत्कालीन कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यामुळेच अन्याय झाल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.