मुंबई – महाविकास आघाडीतुन बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर कामकाज करता येईल असा मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. ज्यात शिंदे गटातील प्रमुख नेत्यांसह भाजपच्या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. अद्याप शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न केल्याने जोरदार टोलेबाजी केली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचं दानवे यांनी सांगितलं आहे. मालवणी महोत्सवाला अंबादास दानवे यांनी हजेरी लावली. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार स्थापन करताना त्यांनी अनेकांना शब्द दिला आहे आणि एवढ्यांचा शब्द पूर्ण करण अशक्य आहे असही दानवे यावेळी म्हणाले.
आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काहीजण सोडून जातील अशी भीती सरकारला वाटत असल्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले. लांबणीवर पडलेल्या मंत्री मंडळ विस्तारावरून यापूर्वीही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता.