नवी दिल्ली – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदावरून मुक्त होऊ इच्छित असल्याच्या चर्चा सुरु होत्या. राज्यपालांनी महापुरुषांबाबत केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्यावरून तापलेले राजकारण सर्वांनी पाहिले. त्यानंतर राज्यपाल स्वतः पदमुक्त होण्यासाठी आग्रही असल्याचे देखील समोर आले होते. अशात पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. आता अमरिंदर सिंह यांनी ही शक्यता फेटाळतयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चांगलेच चर्चेत होते. त्यांच्या जागी अमरिंदर सिंह यांची नेमणूक होणार अशा चर्चा सुरु असताना अमरिंदर सिंह यांनी स्वतः याबाबत भाष्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना अमरिंदर सिंह म्हणाले,”मला याबाबत कोणतीही माहिती नाही,तसेच याबाबत माझ्यासोबत कोणीही संवाद साधलेला नाही. त्यामुळे हा विषय पूर्णपणे काल्पनिक आहे. तसेच मी पंतप्रधान मोदींनी हे सांगितले आहे की मी आपल्या सोबत असून तुम्हाला हवे तिथे मी काम करू शकतो असा खुलासा अमरिंदर सिंह यांनी केला.
It’s purely speculative. Nobody has contacted me. I know nothing about it. Nobody has mentioned anything. I had told PM earlier, I am at his disposal wherever he wants me to be: BJP leader & ex-Punjab CM Capt Amarinder Singh on speculations of him being made Maharashtra Governor pic.twitter.com/w6dve6Q7Be
— ANI (@ANI) February 2, 2023
भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांमध्ये विरोधक भाजपवर जोरदार हल्ला करू शकतात. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोश्यारी हे देखील राज्यपाल पद सोडण्यासाठी आग्रही असलयाचे समजते. अशात महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे देखील लक्ष लागून आहे.