चंदीगड – काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ‘अपमान सहन करून पदावर राहू शकत नाही, मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करायची हा निर्णय घेण्यास पक्ष स्वतंत्र आहे’ असे अमरिंदर सिंग यांनी यावेळी सांगितले. ‘योग्य वेळ आल्यानंतर पुढील राजकीय निर्णय घेऊ’ असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वीच पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. पंजाबमधील ५० काँग्रेस आमदारांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहीत विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याची मागणी केली होती. ही बैठक शनिवारी सायंकाळी ५ वाजता होणार असल्याचं शुक्रवारी उशिरा पक्षातर्फे सांगण्यात आलं होत.
या बैठकीपुर्वीच अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधत ““अशा अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत,” असे सांगितल्याचे समजते.
काय म्हणाले अमरिंदर सिंग?
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “मला अपमान झाल्यासारखे वाटत आहे. मी सरकार चालवू शकत नाही अशी शंका पक्ष श्रेष्ठीना होती का? पक्षाचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याला मुख्यमंत्रीपदी नेमण्याचे स्वातंत्र्य पक्षाला आहे.” असं ते म्हणाले.
दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत सुरु असलेल्या पक्षांतर्गत लढाईत पराभूत झालेले अमरिंदर सिंग विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाविरोधात युद्ध पुकारणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
#WATCH | “…I told Congress President that I will be resigning today…Did they have an element of doubt that I couldn’t run the govt…I feel humiliated…Whoever they have faith in, can make them (CM),” says Amarinder Singh after resigning as Punjab CM pic.twitter.com/4HeUl8JN7Z
— ANI (@ANI) September 18, 2021