जवळपास ३ हजार एस.टी.बसचे रुपातंर ट्रक मध्ये करणार…
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राज्यात एस.टी.बसची एसटी ट्रकमध्ये निर्मिती करून राज्यातील ३५० एसटी बस आगारातून मालवहातूक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे.
राज्य शासनाने राज्यभरात ठप्प झालेला एस.टी.महामंडळाचा कारभार रुळावर आणण्यासाठी मालवहातुकीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात जवळपास ३ हजार एस.टी.बसचे रुपातंर ट्रक मध्ये करून या बसेस सेवेत दाखल होणार आहे. पँकबंद ट्रक असल्याने आगामी पावसाळ्यात शेतकरी ,व्यापारी यांच्याकडुन मालवहातुकीला प्राधान्य मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडुन केले जात असले तरी राज्यशासनाच्या अखत्यारीत असणारा रेशंनिग वरील धान्य,बी – बियाणे,खते, शालेय पोषण आहार, आदिसह विविध पार्सल सेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. एस.टी.बस ट्रकची वहातुक क्षमताही ८-९ टनाची असल्याने वहातुकीचे दर निश्चित करुन ही सेवा येत्या आठवड्याभरात सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1222188218120881/
सध्या लाँकडाऊन च्या काळात खाजगी मालवहातुकीवर मोठा परीणाम होताना दिसत आहे. अनेक ट्रक चालक आपल्या गावी अडकुन पडले आहेत. अनेक खाजगी कंपन्याची पँकबंद असणा-या खाद्यपदार्थासह, विविध साहित्य वहातुकीला एस.टी.ने मागणीनुसार उद्योजक, व्यापारी, शेतकरी वर्गाला ट्रक उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण राबविताना प्रत्येक बसस्थानकात स्वंतत्र मालवहातुक कक्ष सुरु करण्यात येणार असल्याने राज्यभरात एस.टी.महामंडळाच्या वहातुक जाळ्यामुळे चालकांना काम उपलब्ध होणार आहे.