नवी दिल्ली – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी सध्या देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून याचा सर्वाधिक फटका परप्रांतात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना बसलाय. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने परराज्यात अडकलेले हे मजूर आता आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पायी निघाल्याचं विदारक चित्र देशभरामध्ये पाहायला मिळतंय. अशातच आता या पायी चालत निघालेल्या मजुरांची मदत करण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी योगी सरकारकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेशाकडे पायी निघालेल्या मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी १००० बसेस चालवण्याची परवानगी काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
या पत्रामध्ये प्रियंका गांधी यांनी, ‘आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पायी निघालेल्या ६५ मजुरांना अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले असून ही संख्या कोरोनामुळे गेलेल्या जीवांपेक्षा देखील अधिक आहे. या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी आपण काँग्रेसला १००० बसेस चालवण्याची परवानगी द्यावी. या बसेसमध्ये कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन केले जाईल.” असं नमूद केलं आहे.
प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या या मागणीला उत्तर प्रदेश सरकारतर्फे काय प्रतिसाद दिला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज यूपी सरकार को पत्र लिखकर कांग्रेस की तरफ से 1000 बसें चलाने की अनुमति मांगी है।
रोज होती दुर्घटनाएं, असहनीय पीड़ा, अमानवीय हालात। हमारे कामगार भाई-बहन और उनके बच्चे संकट के दौर से गुजर रहे हैं।
मैंने सरकार से पहले भी अपील की है कि कृपया बसें चलाकर पैदल चल रहे.. 1/2 pic.twitter.com/Bw2EOIkgil
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2020