विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी २३ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ९५ हजार ९९७ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. ६ लाख १६ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ३२ हजार ९३३ गुन्हे नोंद झाले असून २७ हजार १५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी २३ लाख ४० हजार ३३१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २७५ (८५४ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०३ हजार ९२२
राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख १६ हजार ७४६
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ८३ हजार ४८२
परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे नोंदवलेले गुन्हे – १५
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४६
(मुंबईतील ३० पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३१, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १)
कोरोना बाधित पोलीस – ११३ पोलीस अधिकारी व ८७६ पोलीस कर्मचारी
राज्यातील एकूण रिलिफ कँप -१०९ (सुमारे ३ हजार ५४८ लोकांची व्यवस्था)