पेठ – पेठ तालुका आंबेगाव राज्यात करोना मुळे सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद असल्याने इयत्ता 1ली ते इयत्ता 8 वी च्या मुलांना शिल्लक असलेला शालेय पोषण आहार योजनेतील धान्यादी माल व सर्व डाळी वाटून टाकाव्या .त्यासाठी मुलांना टप्प्या टप्प्याने बोलावून गर्दी न करता वाटून टाकण्याचे आदेश शासनाने मुख्याध्यापक यांना दिला आहे.
सध्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा पुनपूर्ण बंद आहेत.करोना साथीचा प्रादुर्भाव शहरी व ग्रामीण भागात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या. शालेय पोषण आहार योजना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सध्या तांदूळ,विविध डाळी, मसाले, तेल पुडे ,मीठ जिरी मोहरी आदी माल शाळेत शिल्लक आहेत.तो धान्या दी माल बंदिस्त असल्याने खराब होऊन त्याला किड लागू शकेल.त्यामुळे माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वी च्या मुलांना शाळेच्या वेळात योग्य समयी सकाळी बोलावून शिल्लक साहित्य समान पद्धतीने नियमानुसार वाटप करावे.व ते संपवून टाकावे.
न शिजवता कोरडा शिधा वाटप करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.हे धान्य जर मुलांना वाटून उरले तर ते नजीकच्या वसतिगृहातील मुलांना वाटप करावे. वाटप करण्याचे नियोजन मुख्याध्यापक, शाळा समिती ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थित शालेय पोषण विभागाचे शिक्षक व सेवक यांच्या मदतीने वाटप करून त्याचा वाटप अहवाल शासनास पाठवायचा आहे.
धान्य व इतर माल हा रोज वाटप करण्यासाठी नियोजन करावे.जेणेकरून वाटप करताना
मुलांची गर्दी होता कामा नये.रोज एका वर्गातील मुले बोलवावीत.व त्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या खोली समोर पांढऱ्या फक्की ने रेषा ,उभे राहण्यासाठी दोन फूट दूर असलेल्या अनेक चौकटी तयार करावीत.ज्यामुळे कोरोना साथीचा फैलाव होणार नाही.व इयत्ता 5 वी ते 8 वी च्या मुलांना शालेय पोषण आहार धान्यादी माल, तेल,तांदूळ,मसाले ,डाळी वाटप करण्यात येणार आहे.
फक्त मुलांची एकत्र गर्दी होता कामा नये.मुले धान्यादी माल घेतल्यानंतर शाळेत,शाळेबाहेर न थांबता त्यांना शिक्षकांनी लगेच घरी जाण्यासाठी सूचना द्यावा असे आवाहन पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ गणपतराव मोरे यांनी केले आहे.जो विध्यार्थी आजारी असेल किंवा त्याचे पालक आजारी असेल तर सदर मुलाचे धान्यादी मालाचे वाटप त्या मुलाच्या घरी जाऊन द्यायचे आहे.सर्वोच्च न्यायालयात यावरील जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा निकाल दि 18 रोजी लागल्याने त्वरित आमलबजवणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत