अमरावती : वलगाव येथील 147 पूरग्रस्त कुटुंबांना महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूखंड वाटप (पट्टेवाटप) करण्यात आले. अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मागणीच्या पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. प्रत्येक अडचणीवर मात करत कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पूरग्रस्त बांधवांना हक्काचा भूखंड (हक्काचे पट्टे) मिळू शकला. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे भूखंड वाटपाचा (पट्टेवाटप) कार्यक्रम झाला. पुनवर्सन उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, प्राचार्य लता कोठारी, गजानन राठोड, मोहिनी मोहोड, हरिष मोरे आदी उपस्थित होते. पट्टेवाटपाची प्रक्रिया ईश्वरचिठ्ठी पद्धतीने राबविण्यात आली.
प्रशासनातर्फे आवास योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी. येथील 42 नागरिकांची घरकुले मंजूर करण्यात आहेत. ती प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी. पावसाळ्यापूर्वी घरकुलांचे अधिकाधिक काम पूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
मतदारसंघातील वलगाव येथे 147 पूरग्रस्त कुटुबांना भूखंड वाटप करण्यात आले. 2007 मधील पूर बाधित नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. विशेष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पूरग्रस्तांना भूखंड मिळू दिले.पूरग्रस्त बांधवांना हक्काचा भूखंड मिळू शकले याचा आनंद नक्कीच आहे. pic.twitter.com/QvXXBTktCh
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 25, 2022
वलगाव परिसरातील 2007 मधील पूर बाधित नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यामुळे पूरग्रस्त बांधवांना हक्काचा भूखंड मिळू शकला अशी भावना या बांधवांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.