मुंबई – ओबीसी आरक्षणावरून राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. OBCचे जे काही राजकीय आरक्षण गेले आहे. या राजकीय आरक्षणाचा खून या महाविकास आघाडी सरकारने केला आहे.अक्षरशः पद्धतशीरपणे ज्याप्रकारे एखाद्याची कत्तल करायची. तशा प्रकारे OBCच्या राजकीय आरक्षणाची कत्तल महाविकास आघाडी सरकारने केली आहे. असे आरोप फडणवीस यांनी केले आहेत. ते भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणीमध्ये बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये या सरकारचा OBC विरोधी बुरखा हा टराटरा फाडलाय यांचा OBC विरोधी चेहरा हा याठिकाणी समाजासमोर आणला आहे. सातत्याने ओबीसींच्या प्रश्नावर आपण सगळे लोक रस्त्यावर आंदोलन करीत आहात आणि या सरकारला वेळोवेळी OBC हिताचे निर्णय घेण्याकरता आणि ओबीसींचं अहित होऊ नये याकरता आपण सातत्याने मजबूर केले आहे. खरंतर आज ज्या परिस्थितीमध्ये ही OBC कार्यकारणी होती आहे.ती परिस्थिती अत्यंत दुःखद आहे.
मंडल आयोगाच्या अंमलबजावणी नंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या निवडणूका OBCच्या आरक्षणा बिना होत आहेत. काही निवडणुका झाल्या आहेत आणि उरलेल्या निवडणूका होऊ घातलेल्या आहे. अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रात असताना ही कार्यकारणी याठिकाणी होते आहे आणि या निवडणूका ज्या झालेल्या आहेत आणि हे जे काही राजकीय आरक्षण गेलंय. हे राजकीय आरक्षण हे गेले नाही, या राजकीय आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. या राजकीय आरक्षणाचा खून हा महाविकास आघाडी सरकारने केला आहे. अक्षरशः पद्धतशीरपणे ज्याप्रकारे एखाद्याची कत्तल करायची तशा प्रकारे OBCच्या राजकीय आरक्षणाची कत्तल या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. याच्या पाठीमागे अत्यंत मोठं षडयंत्र आहे. असे आरोप फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर लावले आहेत.