पुणे – भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप धांदात खोटे व बदनामिकारक असल्याचे उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे परभणीचे लोकसभा उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांनी दिले आहे.
तृप्ती देसाई यांच्यासोबत असलेल्या तीन्ही महिलांनी वेळोवेळी अनेक लोकांविरुध्द त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत. मागील अनेक वर्षापासून संबंधीत महिला मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मी दाद दिली नाही म्हणून माझ्यावर धांदात खोटे आरोप आणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
या विरोधात मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणातले सर्व साक्षी पुरावे मी न्यायालयात दाखल केले आहे. यामुळे मला जे काही बोलयाचे आहे ते मी न्यायालयातच बोलेल असे विटकर यांनी प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.