मुंबई – करोनाचा फटका भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा एकदा बसला आहे. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्धच्या मालिका होणार नसल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
मुळातच आयसीसीला डावलून दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ व बीसीसीआय यांनी काही मालिकांचा घाट घातला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळात अंतर्गत दुही समोर आली आहे. त्यातच या मालिकेला हिरवा कंदील दाखवलेला नसल्याचेही बीसीसीआयने म्हटले होते. करोनाचा धोका कायम राहिल्याने हे दौरे संकटात आले आहेत.