मुंबई : शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. येत्या खरीप हंगामापासून ‘महाडीबीटी पोर्टल’वर हि प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे.
यावेळी शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी एकाच अर्ज द्यावा लागणार आहे. शेतकऱ्याच्या अर्जावर काय कारवाई झाली याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागात जाण्याची गरज पडणार नाही अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
कृषीमंत्र्यांनी आज नागपूर,अकोला, अमरावती येथे आढावा बठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. तसेच विदर्भाच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना लाभ घेता आला पाहिजे, अशा सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या.या योजनेचे मोबाईल ॲप देखील विकसित करावे, अशी सूचना कृषीमंत्री भुसे यांनी विभागाला केली आहे.