करण जोहरने त्याचा मोस्ट अवेटेड शो ‘कॉफी विथ करण’ सीझन 7 सह दाखल केला आहे. वर्षाच्या 7व्या महिन्याच्या 7 तारखेला त्यांनी या शोच्या 7व्या सीझनची सुरुवात दोन प्रसिद्ध स्टार्ससोबत केली. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे दोन प्रमुख कलाकार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबतच चित्रपट निर्माते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसले. संभाषणादरम्यान आलियाने रणबीर कपूरने तिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हाचा किस्साही शेअर केला.
रणबीरने रोमँटिक पद्धतीने याची योजना कशी आखली याचा खुलासा आलियाने यावेळी केला. आलिया भट्टने ‘कॉफी विथ करण’ च्या सीझन 7 मध्ये खुलासा केला आणि सांगितले की रणबीर कपूरने तिला कसे प्रेमाने प्रपोज केले. लग्नाचा तो प्रस्ताव असा होता, ज्याचा तिने विचारही केला नव्हता. रणबीर आणि तिच्या लव्ह स्टोरीबद्दलचे सर्व गुपित यावेळी आलियाने उघड केले.
कोरोनामुळे विलंब झाला
आलियाने संवादादरम्यान सांगितले की, रणबीरच्या नियोजनामुळे मला आश्चर्य वाटले, कारण मी असा काही विचार केला नव्हता किंवा त्याची अपेक्षाही केली नव्हती. आलिया पुढे म्हणाली की आम्ही याबद्दल बोलतही नव्हतो, कारण जेव्हा आम्ही याबद्दल बोलत होतो तेव्हा कोरोना आला आणि उशीर झाला. त्यामुळे आम्ही आता यावर बोलायचे नाही असे ठरवलं आणि रणबीरने तेच केले.
मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमध्ये प्रपोज केले
आलियाने पुढे सांगितले की, त्याने याबद्दल कोणालाही सांगितले नाही, फक्त अंगठी घेतली आणि लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी एक अप्रतिम जागा निवडली. ते ठिकाण जिथून दोघांचे भावनिक नाते आहे. ते ठिकाण म्हणजे ‘मसाई मारा नॅशनल रिझर्व्ह’. जंगलाच्या मध्यभागी, ते अमेझिंग ठिकाण होते. आलियाने हे देखील उघड केले की रणबीरने त्याच्या ट्रॅव्हल गाईडला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यास सांगितले, ज्यामुळे मला आणखी आश्चर्य वाटले. आलिया पुढे म्हणाली की, सर्व काही संपल्यानंतरही मला स्वप्नासारखे वाटले आणि मी खूप भावूक झाले.
त्या क्षणाची आठवण करून देताना आलिया म्हणाली की, जेव्हा त्याने (रणबीर) मला फोटोबद्दल सांगितले तेव्हा मला असे वाटत होते की, ‘तुम्ही फोटो काढण्यात यशस्वी झालात’. कारण त्यांना माहित आहे की फोटो माझ्यासाठी किती महत्वाचे आहे. मग मी ते फोटो पाहिले, ते खूप खास होती. त्या अमेझिंग जागेवर रणबीरने कधी प्रपोझ केलं ते देखील समजलं नाही पण त्याची आठवण आजही असल्याचे आलिया सांगते.