मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचे यावर्षी रिलीज झालेले बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि नुकताच प्रदर्शित झालेला रक्षाबंधन हे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर घसरले. सलग तीन फ्लॉपनंतरही खिलाडी कुमारचा आगामी चित्रपट ‘कटपुतली’चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
शनिवारी मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंग, चंद्रचूर सिंग, सरगुन मेहता, निर्माता जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक रणजीत एम तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अक्षयला बॉलिवूड चित्रपटांच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्याचे त्याने उत्तर दिले.
अक्षय कुमार कोणत्याही चित्रपटावर काम करत नसल्याबद्दल म्हणाला की, ‘चित्रपट चालत नाहीत, ही आमची चूक आहे, माझी चूक आहे. मला बदलले पाहिजे, प्रेक्षकांना काय हवे आहे हे समजून घ्यावे लागेल आणि यासाठी माझ्याशिवाय इतर कोणालाही दोषी ठरवले जाऊ नये.’
अक्षयने पुढे सांगितले की,’मी याआधी ज्या प्रकारची भूमिका साकारली आहे, त्यामध्ये स्वतःला नवीन पद्धतीने सादर करण्यावर आणि काहीतरी नवीन करण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. ‘खिलाडी’ हा माझ्यासाठी अनेक अर्थाने खास चित्रपट होता. असाच एक थ्रिलर चित्रपट होता ज्याने माझे आयुष्य बदलून टाकले आणि मला चित्रपट विश्वात ओळख दिली. इतकी वर्षे मी थ्रिलर जॉनरसाठी स्क्रिप्टही शोधत होतो. पण ‘खिलाडी’ चित्रपटापेक्षा ‘कठपुतली’ हा पूर्णपणे वेगळ्या जॉनरचा सायको थ्रिलर चित्रपट आहे.’