लखनोै – दिल्लीत कोणत्याही कारणाशिवाय आपले हेलिकॉप्टर रोखले गेले हा भाजपचाच डाव होता असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी केला आहे. काहीही झाले तरी उत्तरप्रदेशातून आपलेच विजयी विमान उडेल असे ट्विट त्यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की आज आपण दिल्लीहून मुज्जफरनगरला हेलिकॉप्टरने जाणार होतो. पण दिल्ली विमानतळावर कोणत्याही कारणाशिवाय आपले हेलिकॉप्टर रोखले गेले. अर्ध्यातासानंतर त्याच्या उड्डाणाला अनुमती दिली गेली. हा खोडसाळपणाचा व जाणिवपुर्वक केलेला प्रकार असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मेरे हैलिकॉप्टर को अभी भी बिना किसी कारण बताए दिल्ली में रोककर रखा गया है और मुज़फ़्फ़रनगर नहीं जाने दिया जा रहा है। जबकि भाजपा के एक शीर्ष नेता अभी यहाँ से उड़े हैं। हारती हुई भाजपा की ये हताशा भरी साज़िश है।
जनता सब समझ रही है… pic.twitter.com/PFxawi0kFD
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 28, 2022
भाजपच्या नैराश्याचेच हे प्रतिक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटवरून ते या हेलिकॉप्टरच्या बाहेर उभे असल्याचा फोटोही शेअर केला आहे. भाजपने सत्तेचा कसा दुरूपयोग चालवला आहे त्याचा हा आणखी एक पुरावा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्ष जो संघर्ष करीत आहे त्या संघर्षातील ही आणखी एक महत्वाची घटना म्हणून नोंद केली जाईल असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.