लखनौ- भारतीय जनता पक्षातर्फे उत्तरप्रदेशात आशीर्वाद यात्रा काढली जाणार आहे, त्या यात्रेची समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली आहे.
ज्यांनी करोना काळात ऑक्सिजन पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांचे श्वास अडकवले होते तेच नेते आता आर्शिवादी यात्रेवर निघाले आहेत असे अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.
त्यांनी या संदेशात आणखी म्हटले आहे की, या सरकारने लोकांचा गॅस सिलिडर महाग केला, ज्यांनी घरातील वीज महाग केली, शेतकरी, महिला, शिक्षक, युवक, दलित व मजुरांच्या यातना ज्यांनी वाढवल्या, ज्या बेरोजगारांचा रोजगार ज्यांनी हिरावला ते लोक आता आशीर्वाद मागण्यासाठी बाहेर पडले आहेत, असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.
भाजप खासदारांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत उत्तरप्रदेशात हा आशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी ही टीका केली आहे.