ऋषभ पंत ( Rishabh Pant ) टी-२० फॉरमॅटमध्ये सातत्याने फ्लॉप ठरत आहे. भारतीय संघात खेळताना मागील काही सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. पंतच्या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर टीका सुरु झाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने थेट पंतच्या संघातील निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऋषभ पंत खरोखरच टी-२० संघात स्थान देण्यास पात्र आहे का, असा सवाल चोप्राने केला आहे.
#NZvsIND | आकाश चोप्राच्या मते, हार्दिक पंड्या हा रोहित शर्मापेक्षा चांगला कॅप्टन
ऋषभ पंतला ( Rishabh Pant ) नेहमीच एक्स-फॅक्टर समजले जात आहे. मात्र त्याने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केलेली नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो ज्याप्रमाणे खेळतो तो आत्मविश्वास त्याच्या टी-२० क्रिकेटमध्ये दिसत नाही. टी-२० मध्ये दबावाखाली चाचपडत खेळण्याची त्याची कमजोरी अनेकवेळा समोर आली आहे. वारंवार संधी मिळूनही ऋषभ पंत फ्लॉप ठरत असून न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही त्याची खराब कामगिरी दिसून आली.
#NZvsIND | आकाश चोप्राच्या मते, हार्दिक पंड्या हा रोहित शर्मापेक्षा चांगला कॅप्टन
तिसऱ्या सामन्यात पंतला सलामीला येऊन म्हणून अवघ्या ११ धावा करता आल्या. याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त ६ धावा निघाल्या होत्या. पंत ( Rishabh Pant ) सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करेल असे बोलले जात होते पण गेल्या दोन सामन्यांत त्याची बॅट शांत राहिली. पंतला सलामीला अनेकवेळा संधी मिळूनही चांगली कामगिरी करता न आल्याने त्याच्यावर टीका होत आहे.
ऋषभ पंतबाबत संघ व्यवस्थापन गोंधळात
आकाश चोप्राने ऋषभ पंतच्या ( Rishabh Pant ) सलामीला खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “ऋषभ पंतची दोन्ही सामन्यातील कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतोय की तो सलामीवीर आहे की तुम्हाला त्याला सलामीवीर बनवायचे आहे. तो खरोखरच टी-२० संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे. ऋषभ पंतला त्याची ही प्रतिभा वाया घालवायची नाही. म्हणूनच तुम्ही त्याला सलामीला खेळवत आहेत. ऋषभ पंत सर्वोत्तम कामगिरी कशी करेल, असा विचार संघ व्यवस्थापन आणि भारतीय निवड समितीच्या डोक्यात सुरू आहे.”