मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी राष्ट्रवादीतच असल्याचे विधान केले. तसेच शरद पवार आमचे नेते असतील. आमची भाजपा-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षे महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल जी राज्य व लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या या ट्विटर नंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
पवार म्हणाले, “भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे”.
भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. @NCPspeaks ने @ShivSena व @INCMaharashtra यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. @AjitPawarSpeaks यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 24, 2019