मुंबई – बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे, असे विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्मण सवदी यांना फटकारले आहे. मुंबई चा काहीही कर्नाटकशी संबंध नाही. जनतेला खुश करण्यासाठी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी हा लॉजिक लावला आहे. असे अजित पवार यांनी पत्रकरांशी बोलतांना प्रतिक्रीया दिली आहे.
सीमावाद : ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरू नये’
सीमावाद पुन्हा पेटला ! महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी
ते पुढे म्हणाले,”कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत जे विधान केलेलं त्याला काहीही एक लॉजिक नाही. बेळगावचा वाद जुना असून माझ्या माहितीनुसार बेळगावमध्ये मराठी भाषिक आधी निवडून यायचे तेव्हा तेथील मराठी भाषिक लोकांचीच मागणीही महाराष्ट्रात येण्याची होती. मात्र नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली.”असं म्हणत अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.
दरम्यान, लक्ष्मण सवदी यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सीमावाद प्रश्नावरून वाद पेटण्याची चिन्ह दिसून येत आहे . तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सीमावादावर सुप्रीम कोर्ट शेवटचे हत्यार असेल असं म्हणत शरद पवारांनी मांडली भूमिका आहे .