मुंबई – राज्यचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे.
शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये. अन्यथा मातोश्रीवर कॅमेरे लागतील, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिला. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, चंद्रकांत पाटील यांचे दुःख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाय मरत नाही, असा टोलाही अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
तसेच शेतकरी कर्जमाफीवरुन कुणीही श्रेयवादाचे राजकारण करु नये, हे महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यांचं ते श्रेय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.