Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला असून, राज्य आणि देशभरात शोककळा पसरली आहे. अजित पवार हे बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचारासाठी जात होते. अपघाताची सविस्तर माहिती अजित पवार हे मुंबईहून VSR कंपनीच्या खासगी Bombardier Learjet 45 विमानाने (रजिस्ट्रेशन VT-SSK) बारामतीकडे निघाले होते. विमानाने सकाळी सुमारे ८:१० वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण केले आणि बारामती विमानतळावर ८:५० वाजता लँडिंग होणार होते. Ajit Pawar मात्र, लँडिंगच्या वेळी विमान रनवेवरून बाजूला गेले आणि क्रॅश झाले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. हा अपघात बारामती विमानतळाजवळील खुल्या मैदानात किंवा रनवेच्या आसपास घडला. विमानात एकूण पाच जण होते, ज्यात अजित पवार यांच्यासह खालील व्यक्तींचा समावेश होता: – अधिकारी विदिप जाधव – पिंकी माळी – कॅप्टन सुमित कपूर (पायलट) – कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट/क्रू मेंबर) ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करताना म्हटले की, “राजकीय नेत्यांसाठीही कोणतीही सुरक्षा नाही.” तसेच, अलीकडील सोशल मीडियावरील पोस्ट्सचा उल्लेख करत त्यांनी अजित पवार महायुती सोडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. “आज जे घडले, त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आमचा फक्त सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, इतर कोणत्याही संस्थेवर नाही,” असे ते म्हणाल्या. तपास यंत्रणांनी स्वातंत्र्य गमावले असल्याचा आरोपही त्यांनी केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कळीचे नेते होते. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तज्ज्ञांच्या मते धुंध, दुसरी लँडिंग अटेम्प्ट किंवा तांत्रिक बिघाड यासारखे घटक असू शकतात. हे पण वाचा : Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर उपस्थित झालेले 5 प्रश्न