Ajit Pawar : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आज सकाळी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती या ठिकाणी मोठा अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या या निधनाच्या बातमीने राज्यभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक राजकीय नेतेमंडळींना अश्रु अनावर झालेत. तसेच नेतेमंडळींकडून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त करत विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत माझा मोठा भाऊ गेला. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कुणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे. काय म्हणाले एकनाथ शिंदे? मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. अजित पवार यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं, मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना इतर कोणत्याही योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी किंवा आर्थिक तरतूद आहे ती अतिशय उत्कृष्टपणे आणि उत्तमपणे अजित पवारांनी त्यावेळी संभाळली. त्यांच्या कामाचा चांगला अनुभव मला आहे, एकदा करायचं ठरवलं की अजित दादा ते करायचे, करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते, चांगला असेल तर काय करायचं तर करायचं म्हणायचे, जे वाईट आहे त्याला स्पष्टपणे नाही म्हणायचे, असा स्पष्ट वक्तेपणा त्यांचा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे, मी असेन किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या तरी आम्ही पहाटेपर्यंत काम करायचो, अजित दादा पहाटे लवकर कामाला सुरुवात करायचे, अजित दादांनी पहाटे सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिल्या होत्या, त्यांच्या कामाचा अनुभव लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना देखील आहे. वेळेचे महत्व आणि भान ठेवून ते काम करायचे, असा नेता हरपला आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मोठा भाऊ हरपल्याची भावना त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालंय. आम्ही राजकारणात तिघे मिळून एकत्र काम करत असलो तरी राजकारणातील एक मोठा भाऊ हरपल्याची, गेल्याची भावना आणि दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे. मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करताना मनात दु:खाच्या भावना आहेत. शेवटी आमच्या सहकाऱ्याचा जीव गेलाय. विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल या विमान अपघातात 6 लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे आणि चौकशी नक्कीच होईल. या पुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये. यासाठी ते गरजेचं आहे. त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. Chitra Wagh post : “अजित दादा आपल्यात नाहीत हे स्वीकारणचं अवघड जातंय”; चित्रा वाघ यांची दु:खद पोस्ट